राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतल्यानंतर आज त्याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामाची वेळ पाऊण तासानं वाढवण्यात आली आहे. त्यामुळं आता सरकारी कार्यालयं दररोज सव्वा सहा वाजता सुटणार आहेत.
पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या उर्वरीत दिवसांतील कामकाजाच्या वेळेत वाढ होणार, अशी चर्चा होती. ती खरी ठरली आहे. आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात सर्व कामकाजाचे नवे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. दिनांक २९ फेब्रुवारी, २०२० पासून 'फाइव्ह डे वीक'चा नवा निर्णय लागू करण्यात आल्याचं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू होत नसलेल्या सरकारी कार्यालयांची यादीही शासन निर्णयासोबत देण्यात आली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना आता रोज जास्त काम
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
बदलापूर: कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत आणि प्रभागरचना येत्या २५ फेब...
-
अंबरनाथ :- येथील सर्वोदय नगर भागातील भवानी ज्वेलर्स या दुकानावर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने शहरात खळबळ माजली आहे. भरदिवसा ज्...
-
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आ. गुलाबराव पाटील आणि आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या समर्थनार्थ आज अंबरनाथमध्ये एकव...
-
सुवर्णा साटपे यांचा आगळा वेगळा उपक्रम बदलापूर: भारतीय संस्कृतीमध्ये वटपोर्णिमा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वटपौर्णिमेच्या सण...