बदलापूर :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून बदलापूर शहरात रिक्षांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. मात्र शहरात राहणाऱ्या अनेक नागरिकांना मेडिकल इमर्जन्सीसाठी सगळ्यांकडेच खासगी वाहने नसल्याने ऑनकॉल रिक्षांना परवानगी द्यावी अशी मागणी विविध पातळ्यांवरून होती. याच मागणीचा राज्य शासनाने देखील गेल्या काही दिवसांपासून अनेक शहरांमध्ये विचार करून त्याला परवानगी दिली आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहरात देखील या ऑनकॉल रिक्षांना परवानगी अंबरनाथ वाहतूक विभागाने दिली असल्याची माहिती अंबरनाथ वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली. मेडिकल इमर्जन्सी, मेडिकल निगडीत सामान पोहोचवणे यासह अत्यावश्यक सेवांसाठी या रिक्षांचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन सुनील जाधव यांनी केले आहे. सध्या काही मोजक्याच रिक्षांना परवानगी देण्यात आली असून नागरिकांच्या सोयीसाठी यापुढील काळात देखील काही रिक्षांना परवानगी दिली जाऊ शकते. मात्र नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे आणि सुरक्षित रहावे असे आवाहन सुनील जाधव यांनी केले आहे.
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
भाजपाचा आव्हानाचा प्रयत्न फोल #टीडीसीसीबॅंकनिवडणूक मुरबाड , : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (टीडीसीसी) मुरबाड-प्राथमिक...
-
शुभ मुहूर्तांपैकी महत्त्वाचे मानले जाणारे म्हणजे साडे तीन मुहूर्त. ज्यात दसरा, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे तीन मुहूर्त आणि दिवाळीतील पाडवा ...
-
येत्या १९ फेब्रुवारी रोजी राज्य शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. शिवसेनेनेही शास...
-
एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाऱ्या अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर नगरपालिकासह राजगुरुनगर, भडगांव, वरणगाव, भोकर, मोवाड आणि वाडी या नगरपालिका नि...
-
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांतील विधानपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची आज (बुधवारी) घोषणा के...