पार्थ पवार फोंडेशन तर्फे अन्नधान्य व भाजीपाला वाटप
बदलापूर:- कोरोना चा वाढता संसर्ग लक्षात घेता सरकारने सगळीकडे ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केले त्यामुळे बऱ्याच कुटुंबांवर काम नसल्याने उपासमारीची वेळ आली.अनेकांना जीवनावश्यक धान्य व भाजीपाला घेणं अवघड झालं आहे. गोरगरीब जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून बदलापूर शहर आणि परिसरात गरजू लोकांना धान्य आणि भाजीपाला वाटप करण्यात येत आहे.
लॉक डाऊन जाहिर झाल्यापासून गरीब आणि गरजूंना आवश्यक ती मदत पोहचविण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत, अशा वेळेस अनेक सामाजिक संस्था देखील मदत करण्याकरता पुढे सरसावले आहेत. पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास सहाशे लोकांना दररोज अन्नदान करण्यात येते.
पार्थ पवार फौंडेशनचे कार्यकर्ते बदलापूर शहरातील विविध भागात घरपोच जेवणाचे पॅकेट पोहोचण्याचे काम करीत आहेत. आज फाउंडेशन च्या माध्यमातून अन्नधान्य तसेच भाजीपालाचे वाटप करण्यात आले.कार्यकर्त्यांनी जवळपास १५०० हून अधिक लोकांपर्यंत आज ही मदत पोहचली.