बदलापूर : बदलापूरात कोरोनाचे 14 रुग्ण आढळल्यानंतर बदलापूरातील डॉक्टर देखील सतर्क झाले आहे. बदलापूरातील एका खाजगी रुग्णालयात डॉक्टराने आपल्या रुग्णालयात जन्माला आलेल्या नवजात बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी कक्ष उभारले आहे. बालकाचा जन्म होताच त्याला कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतली जाते. तसेच त्याच्या संपर्कात त्याच्या आई शिवाय इतर कोणतेही नातेवाईक येणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
बदलापूर हे कोरोनाचे हॉट स्पॉट होत असतांना आता बदलापूरातील खाजगी रुग्णालयाती डॉक्टर देखील सतर्क झाले आहे. बदलापूरातील डॉ. भारती चॅटर्जी आणि डॉ. जॉयदिप चॅटर्जी यांनी आपल्या रुग्णांची योग्य सुरक्षा राखण्याचे काम केले आहे. डॉ. भारती ह्या त्यांच्याकडे जन्माला आलेल्या नवजात बालकांची योग्य काळजी घेत आहे. त्यांच्याकडे नोंदणीकृत रुग्णांवरच ते उपचार करित आहेत. लहान बालकांना इतरांचा त्रस होणार नाही यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. जन्माला आलेल्या मुलाला इतरांपासुन कोरोनाचा धोका होणार नाही यासाठी खास यंत्रणा उभारली आहे. या रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळाला आणि त्याच्या आईची निगा राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहे. त्यांच्या व्यतिरीक्त इतर कोणीही त्या बालकाच्या जवळ जात नाहीत. बाहेरील व्यक्त आल्यावर बाळाला तात्पुरत्या स्वरुपात मास्क लावले जाते. मास्क असे पर्यंत त्या बाळाजवळ नर्सला ठेवण्यात येते. येवढेच नव्हे तर बाळाच्या आईला देखील मास्क बंधनकारक केले आहे. बाळाचे इतर नातेवाईकांना जवळ जाण्यास मज्जाव घालण्यात येत आहे. बाळाच्या आणि बाळाच्या आईच्या सुरक्षेसाठी ह्या अटी घालण्यात आले आहे. बाळ आणि आईला स्वतंत्र कक्षातच ठेवण्यात येते. जेणोकरुन ते इतर रुग्णांच्या संपर्कात येणार नाही.
‘‘ बाळाला सतत मास्क लाऊन ठेवता येत नाही. त्याला श्वास घेण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्या बाळाच्या संपर्कात इतर कोणी येणार नाही याची सर्वाधिक काळजी घेतली जाते. तसेच बाळाची आणि बाळाच्या आईवर उपचार करणारे नर्स हे देखील योग्य दक्षता घेऊनच त्यांच्या संपर्कात येत आहे. त्यामुळे लहान बालकांवरील धोका कमी होण्यास मदत होते.
- डॉ. भारती चॅटर्जी, बदलापूर.
कोरोनापासुन बचाव करण्यासाठी नवजात बालकांची घेतली जाते काळजी
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...

-
अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आ. गुलाबराव पाटील आणि आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या समर्थनार्थ आज अंबरनाथमध्ये एकव...
-
सुवर्णा साटपे यांचा आगळा वेगळा उपक्रम बदलापूर: भारतीय संस्कृतीमध्ये वटपोर्णिमा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वटपौर्णिमेच्या सण...
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजि...
-
अंबरनाथ : एकनाथ शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात ...
-
आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन जगभरात दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. पृथ्वीच्या संरक्षण, संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा ...