गरजूंच्या मदतीला धावले ताई'ज किचन; दररोज ५०० लोकांना दिले जाते मोफत भोजन

गरजूंच्या मदतीला धावले ताई'ज किचन; दररोज ५०० लोकांना दिले जाते मोफत भोजन


बदलापूर :- स्वस्त दरात सकस आणि दर्जेदार जेवण देण्याकरिता प्रसिद्ध असलेले बदलापूर येथील ताई'ज   किचन गरीब आणि गरजूंच्या मदतीला धावत आले असून त्यांच्या माध्यमातून दररोज जवळपास सहाशे लोकांना मोफत जेवण दिले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा गटनेते आशिष दामले त्यांच्या प्रयत्नातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर येथे सकस आणि दर्जेदार घरचे जेवण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून तीन वर्षापूर्वी ताई'ज किचन ची सुरुवात झाली. 

लॉक डाऊन मुळे अनेकांना दोन वेळचे जेवण मिळणे मुश्किल झाले आहे. काम धंदे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या मदतीला धाऊन आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आशिष दामले यांनी ताई'ज   किचनच्या माध्यमातून दररोज ५०० जणांना मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. 

 सकाळी ११ वाजल्यापासून  किचन सुरु होते. सुरुवातीला काही चुकीचं याठिकाणी जेवण देण्यात येते त्यानंतर शहरातील अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या तसेच इतर गरजूंना पार्सल द्वारे जेवण पोहचविण्यात येत आहे. विशेष म्हणजे यात सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी या ठिकाणी तीन फूट अंतर ठेवून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच एका कुटुंबात 10 लोक असतील, तर एक व्यक्ती येऊनही तो संपूर्ण कुटुंबाचे जेवण घेऊन जाऊ शकतो. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे त्याद्वारे विविध कार्यकर्त्यांचे मोबाईल नंबर देण्यात आले आहेत त्यानुसार आवश्यकतेनुसार किराणा सामान औषधे तसेच स्वच्छते बाबत काही तक्रार असल्यास तक्रारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तेथे उपस्थित होऊन ती सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. 

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...