महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्प प्रसिद्ध झाल्यानंतर कर्जमाफी ची महत्वपूर्ण घोषणा सरकारने घोषित केली आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने असणाऱ्या या योजनेत पंधरा हजार लाभार्त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ही यादी जाहीर करताना सरकारनं प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश केलेला असून, पहिल्या यादीत ६८ गावातील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावं आहेत. राज्य सरकारनं कर्जमाफी योजनेची अमलबजावणी करण्यापूर्वी ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती संग्रहित केली होती. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. जिल्हा पातळीवर कर्जमाफीच्या अमलबजावणीचं काम सुरू झालं असून सरकारनं कर्जमाफीसाठी पुरवणी मागणी सभागृहात पटलावर ठेवली आहे. यावर २७ फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री दादाजी भुसे यांनी या बद्दलची माहिती दिली होती. या बद्दलची माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर २७ फेब्रुवारी व २ मार्च ला यावर चर्चा होणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. विरोधकांनी मात्र हि कर्जमुक्ती नाही आणि चिंतामुक्तीही नाही अश्या शब्दात सत्ताधार्यांवर टिका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाच्या अभिभाषणात विरोधनकावर टिक्का करत हे सरकार विरोधकांस बांधील नाही तर ते लोकांशी बांधील आहे अश्या कोपरखाळ्या ही दिल्या आहेत. घोषणा झाली असली तरी त्याची सक्रिय अंमलबजावणी होणं तितकाच महत्वाचं आहे.
महाराष्ट्र राज्य कर्जमाफी झाली जाहीर
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
भाजपाचा आव्हानाचा प्रयत्न फोल #टीडीसीसीबॅंकनिवडणूक मुरबाड , : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (टीडीसीसी) मुरबाड-प्राथमिक...
-
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांतील विधानपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची आज (बुधवारी) घोषणा के...
-
शुभ मुहूर्तांपैकी महत्त्वाचे मानले जाणारे म्हणजे साडे तीन मुहूर्त. ज्यात दसरा, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे तीन मुहूर्त आणि दिवाळीतील पाडवा ...
-
येत्या १९ फेब्रुवारी रोजी राज्य शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. शिवसेनेनेही शास...
-
एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाऱ्या अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर नगरपालिकासह राजगुरुनगर, भडगांव, वरणगाव, भोकर, मोवाड आणि वाडी या नगरपालिका नि...