अंबरनाथ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा राज्याचा निकाल आज (29 जुलै) जाहीर झाला. एकूण निकाल 95.30 टक्के लागला. तर अंबरनाथ तालुक्यातील निकाल ९७.३७ टक्के इतका लागला आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेला अंबरनाथ तालुक्यात ७६४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ७४४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निक टक्के इतका लागला आहे. दरम्यान, २९०९ विद्यार्थी विशेष प्रावीण्य , २६९१ प्रथम श्रेणीत (First Class) उत्तीर्ण झाले आहेत. तर १४२३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत (Second Class) उत्तीर्ण झाले आहेत. आणि ४२५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत (Pass Class)पास झाले आहेत
सरासरीनुसार भूगोल विषयाचे गुण
यंदा तालुक्यातील तब्बल ६४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला होता. मात्र, इतर विषयांच्या सरासरीनुसार भूगोल विषयाचे गुण देण्यात आले आहेत.
जिल्हयातील तालुकानिहाय निकालाची टक्केवारी
कल्याण ग्रामीण (९७.०८), अंबरनाथ (९७.३७), भिवंडी (९४.४३), मुरबाड (९५.९३), शहापूर (९६.३७), ठाणे मनपा (९६.६२), नवी मुंबई (९७.९५), भाईंदर (९७.३८), कल्याण-डोंबिवली (९५.२९), उल्हासनगर (९५.११), भिवंडी मनपा (९३.८७).