बदलापूरः नाशिकच्या बागांमधील ताजी, निर्यातीच्या दर्जाची द्राक्षे आता अंबरनाथ आणि बदलापूरमधील ग्राहकांना थेट उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाचा कृषीविभाग, शेतीजन्य संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किफातशीर दरात शनिवार २० आणि २१ मार्च सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील विविध केंद्रांवर ही द्राक्ष उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अंबरनाथ शहरात पूर्वेतील खेर विभागात गोखले रहाळकर शाळा येथे पुरूषोत्तम उगले यांच्या कार्यालयाबााहेर शनिवार २० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता, वडवली विभागातील बाजीप्रभू पथ येथे सर्जेराव माहुरकर संपर्क कार्यालय, नवरे नगर बी केबीन रोड येथे मिलिंद गान यांचे शिवसेना जनसंपर्क कार्यालय, सुर्योदय सभागृहासमोर पद्मगुंफा इमारत या चार केंद्रांवर ही द्राक्षे पेटीबंद पद्धतीने उपलब्ध होतील. तर बदलापूर शहरात पश्चिम भागात सुर्वोदय नगर परिसरात हेंद्रेपाडा रस्त्यावर नाल्याच्या शेजारी आणि पूर्व भागात रेल्वे उड्डाणपुलाखाली सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत उपलब्ध असतील. शनिवारी सकाळी बदलापूर येथील सुर्वोदय नगर येथील केंद्रावर जिह्याचे कृषी अधिक्षक अंकुश माने, आमदार किसन कथोरे, मुख्याधिकारी दीपक पुजारी आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या उपस्थितीत या विक्री केंद्रांना सुरूवात होईल. अधिक माहितीसाठी संपर्क - 8766990081.
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...
-
ठाणे जिल्ह्यात कोविड लसीकरणास प्रारंभ ठाणे :- ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रु...
-
बदलापूर पालिकेच्या येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक साठी प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आदर्श महाविद्यालयाच्या भव्य सभाग...
-
ठाणे दि.22- ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या तसेच आश्रमशाळा शाळा दि.२७ जानेवारी ...
-
अंबरनाथ :- सद्यस्थितीत संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत आहे. मागील चार ते पाच महिने सर्वच नागरिक कोरोना विषाणूच्या दहशतीखाली जगत आहेत. दरम्यान...
-
*कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय* *अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रा...